तुमचे बँकेत अकाउंट किती असावेत | अन्यथा तुम्हाला होईल पश्चाताप…
तुमचे बँकेत अकाउंट किती असावेत : देशातील प्रत्येक नागरिकांचे बँकेमध्ये अकाउंट असतात परंतु अनेकांचे अनेक बँकेमध्ये अकाउंट असतात तर काही जणांचे एकाच बँकेमध्ये आपले अकाउंट उघडले जाते, परंतु जास्तीत जास्त बँकेत आपले किती अकाउंट असावेत. याची संपूर्ण माहिती या लेखांमधून आपण पाहणार आहोत. तुमचे बँकेत अकाउंट किती असावेत
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलीकडील सर्व आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन झालेले पाहायला मिळतात, नोटबंदीच्या निर्णयापासून जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहाराला चालना मिळालेली आहे या ऑनलाइन आर्थिक व्यवहारा पाठीमागे सर्वात भूमिका महत्त्वाची म्हणजे बँकेचे असते. नागरिकांच्या सॅलरी पासून ते कर्जापर्यंत सर्व व्यवहार हे बँकेची निगडित असतात एवढंच काय तर आपण आपल्या जी पैशांची बचत करतो ती बँकेत जमा करतो, बँकेच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ देखील घेतला जातो. मात्र अनेक बँकेमध्ये एकापेक्षा अधिक अकाउंट असतात, जर तुमचे बँकेत अनेक खाते असतील तर तुम्हाला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असते, त्यामुळे आज आपण बँकेमध्ये किती एका व्यक्तीचे जास्तीत जास्त खाते असावेत याविषयी माहिती पाहणार आहोत. तुमचे बँकेत अकाउंट किती असावेत

अर्थतज्ज्ञांच्या माहितीनुसार
भारतीय अर्थतज्ञ च्या माहितीनुसार एका व्यक्तीचे बँकेत जास्तीत जास्त तीन खाते असणे आवश्यक असते, पहिले खात्याचे असेल तुमच्या सॅलरी खात असेल या खात्यामध्ये तुमची मासिक सॅलरी जमा करता येते तुम्हाला तुमच्या कंपनीकडून केव्हा ज्या ठिकाणी काम करत आहात ते पैसे या खात्यामध्ये जमा होतील.
अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दुसरे खात म्हणजे तुम्ही फक्त ईएमआय साठी ठेवा, म्हणजेच तुम्ही अनेकदा घर खरेदीसाठी कर्ज घेत असाल किंवा प्रसनल कर्ज घेतलेला असेल किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज घेत असाल तर या अकाउंट मध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. ज्यामधून तुमचे ईएमआय ऑटोमॅटिक कट होतील, तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत.
आता तिसरे खातं म्हणजे तुम्ही तुमच्या सॅलरी मधून महिन्याच्या शेवटी ची बचत करणार आहेत त्यासाठी वापरू शकता म्हणजे तुमचे जे सेविंग खाते असेल. म्हणजेच सर्व बचत झालेले ठेवी ह्या खात्यामध्ये ठेवू शकता. त्यामुळे तुमचा कोणताही गोंधळ होणार नाही.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना | असा करा अर्ज पहा संपूर्ण माहिती
एका पेक्षा जास्त खाते असल्यास काय होऊ शकते.?
अनेक वेळा तुमचे बँकेत तीन पेक्षा जास्त खाते असतील तर त्यातील काही खाते हे निष्क्रिय होतात. म्हणजे तुम्ही प्रत्येक खात्यामधून व्यवहार कराय₹लच असं नाही. ज्या खात्यामध्ये तुम्ही मिनिमम बॅलन्स ठेवू शकत नाही त्या बँकांकडून अशा परिस्थितीमध्ये दंडा कारला जातो, त्यामुळे जर तुम्ही तो दंड भरला नाही तर तुम्हाला आयटीआर भरण्यासाठी समस्या येऊ शकते.
त्यामुळे भारतीय अर्थतज्ञ च्या माहितीनुसार एका व्यक्तीने जास्तीत जास्त तीन खाते बँकेमध्ये खोलावेत. तुमचे बँकेत अकाउंट किती असावेत.