
पिक विमा योजना बंद होणार..?
पिक विमा योजना बंद होणार..? काय आहे प्रकरण पहा सविस्तर…
पिक विमा योजना बंद होणार..? : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या अनेक योजना राज्यांमध्ये सुरू आहेत. नुकतीच 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये देखील अनेक महिलांना अपात्र ठरविण्यात येत आहे. तसेच काहीसे पिक विमा योजनेबद्दल देखील झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक रुपयात पिक विमा योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिक विमा योजनेबद्दल सांगितले. पिक विमा योजना बंद होणार..?
Crop Insurance एक रुपयात पिक विमा योजनेवर संकट आलेले आहे असे आपण अनेक न्यूज चैनल च्या माध्यमातून पाहिला असेलच सध्या पिक विमा योजनेमुळे महाराष्ट्र मध्ये राजकारण देखील चांगलेच आपले आहे एक रुपयात पिक विमा योजनेत बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे एक रुपया पिक विमा योजनेमध्ये बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपया ऐवजी शंभर रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Crop Insurance महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शिफारस केल्याने सगळीकडे एकच बातमी समोर आली आहे. एक रुपया पिक विमा योजना बंद होणार का.? असा प्रश्न देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गातून विचारण्यात येत आहे.

नक्की कृषिमंत्री काय म्हणाले.?
गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकार सर्वसामान्य पिक विमा राबवत आहे व राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक रुपया भरून या योजनेमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना सहभागी होता येते परंतु बीडमध्ये पिक विमा योजनेचा गैरप्रकार समोर आल्यानंतर या योजनेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे आता पिक विमा योजना बंद होणार का अशी चर्चा देखील राज्यभर शेतकरी वर्गामध्ये सुरू आहे यावर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की या योजनेचा जो काही निर्णय असतो कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या गावात असे गैरप्रकार झाले त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील करण्यात आले आहे. पिक विमा योजना बंद होणार..?
पिक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार होत आहे म्हणून योजना बंद करत असाल तर ही पद्धत चुकीची आहे त्यामुळे भ्रष्टाचार कसा बंद करता येईल याच्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. एक रुपयात पिक विमा योजना बंद केली तर विदर्भाचा राज्यात शेतकरी आत्महत्या देखील वाढतील अशी भीती देखील व्यक्त केले आहे तर पिक विमा योजना राज्य सुरू ठेवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची मागणी देखील आहे. पिक विमा योजना बंद होणार..?
Crop Insurance म्हणचे काय..?
भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे राज्यामध्ये बहुतांश वर्ग हा शेतकरी आहे. शेतकरी दागिने, घर जमीन, घाण ठेवून शेताची मशागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कर्ज देखील उचलतो परंतु अतिवृष्टी, वादळ, पूर, गारपीट यासारख्या नैसर्गिक वादळामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसा होते. अशाप्रकारे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसाना पासून वाचवण्यासाठी व त्यांना झालेल्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजना जाहीर होते. ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे झालेले नुकसानाची आर्थिक भरपाई देखील दिली जाते.
पिक विमा योजनेचे मुख्य उद्दिष्टे
● ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते त्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● राज्याचे शेतकऱ्यांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
● पिकांच्या नुकसानीच्या वेळे त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे व अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करणे हे शासनाचे उद्दिष्टे आहेत.
खालील पिकांना पिक विमा दिला जातो
1. ज्वारी
2. बाजरी
3. नाचणी
4. मूग
5. भात
6. कारळे
7. भुईमूग
8. मका
9. कारले
10. सोयाबीन
11. कापूस
12. खरीप कांदा
Namo shetakri yojana 2025 | नमो शेतकरी योजनेमध्ये मोठा बदल आता वर्षाला 3 हजार रुपये…
पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना खालील कागदपत्रांची आवश्यकता भासते.
● आधार कार्ड
● रेशन कार्ड
● रहिवासी प्रमाणपत्र
● जमिनीचा 7/12 उतारा व 8अ
● अधिकृत बँकेचा तपशील
● पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
● मोबाईल नंबर
● ईमेल आयडी
●विहित नमुन्यातील अर्ज
● शपथपत्र
पिक विमा अर्ज करण्याची प्रक्रिया
● राज्यातील अर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या अधिकृत शासनाच्या वेबसाईट वरती जावे लागेल. पिक विमा योजना बंद होणार..?
● होमपेज वर गेल्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करावे.
● आता पुढे शेतकऱ्याला त्याचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून घ्यावे लागेल.
● अर्ज ओपन झाल्यावर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.
● अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजना यासाठी अर्ज करू शकता. पिक विमा योजना बंद होणार..?
शासनाचे अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी whatsapp ग्रुप | जॉईन करा |
सारांश :
राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पिक विमा योजना अमलात आणलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी पिक विमा भरून घेणे गरजेचे आहे. सदरील माहिती आवडली असल्यास इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करावी. पिक विमा योजना बंद होणार..?