
mango crop management 2025
mango crop management 2025 | आंबा या पिकाचे विशेष व्यवस्थापन पहा संपूर्ण माहिती….
mango crop management 2025 : अलीकडे अनेक शेतकरी आंबा या पिकाकडे वळाले आहेत. फळबागांची मोठ्या प्रमाणावरती लागवड करून उत्पादन ही चांगल्या पद्धतीने घेता येते हे शेतकऱ्यांना चांगलेच ठाऊक झाले आहे. आज आपण या लेखांमधून आंबा पीक लागवडी बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, आंबा फळगळतीची कारणे काय आहेत याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देऊन हा लेख वाचावा ही विनंती.
आंबा या झाडावरती येणाऱ्या मोहरापैकी 5 ते 25% पर्यंत द्विलिंगी असतात, तर उर्वरित 75 ते 90% फुले ही नरलिंगी असतात, एकूणच पाहिले तर एकूण फुलांपैकी फक्त 2 ते 3 टक्के फुलांचे परागीकरण होऊन फळधारणा होत असते, बाकी सर्व फुले म्हणजेच मोहर गळला जातो, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. आंब्याला येणार₹ऱ्या एकूण फुलांपैकी फक्त 4ते 5 टक्के फळे जरी काढणीस मिळाले तरी चांगले उत्पादन मिळाले असे शेतकरी वर्गात समजले जाते. परंतु याच्यापेक्षा अधिक जर गळती झाली तर उत्पादनावर 100% मोठा परिणाम होऊ शकतो.
या हंगामातील आंब्याचा विचार केला तर वातावरणामुळे बहुतांश अनेक बागामध्ये मोहर येण्यास थोडा उशीर झालेला पाहायला मिळते. त्यामुळे काही भागांमध्ये फळ धरणा चांगली झालेली आहे, तर काही बागामध्ये मोहर गळून पडलेला आढळत आहे.

आंबा फळगळतीची कारणे पाहूया
mango crop management 2025 : ऑक्झिन्स ही झाडांमध्ये तयार होणारी संप्रेरके आहेत. विशेषतः आंब्याच्या झाडांना फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीला फक्त पेशी विभाजन होत असते, त्यानंतर तीन आठवड्यात पूर्ण होऊन पेशींची अपेक्षित संख्या निर्माण झाल्यानंतर फळांचा आकार वाढण्यास सुरुवात होते, व त्यानंतर काही दिवसातच त्यामध्ये बी वाढण्यास सुरुवात होते.
या आंब्याच्या झाडांमध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये फळांमध्ये व भांड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात ऑक्झिन्स तयार होते तसे पाहायला गेले तर फांदीच्या तुलनेत फळात जास्त ऑक्झिन्स असेल तर फळगळती कमी होण्यास फायदा होतो. फळावर पडलेला सूर्यप्रकाश व तापमाना यामध्ये झालेली वाढ किंवा फळावर आलेला भुरी-तुरड्यांचा प्रादुर्भाव अशा कोणत्याही कारणामुळे फळातील ऑक्सिजन हे नाश पावते म्हणजेच त्याचे प्रमाण कमी होते. mango crop management 2025
आंब्याच्या जातीनुसार होणारी फळगळती
एकूणच पाहायला गेले तर आंब्याच्या ज्या झाडाच्या जातीमध्ये देठ मजबूत असतो त्याची फळगळती नक्कीच कमी होत असते मात्र अनेक आंब्याच्या झाडांमध्ये देठांमध्ये गुंफत असेल तर त्या जातीच्या फळांमध्ये फळगळतीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर ते असते. (याचे उदाहरण पाहायला गेले तर लग्न ही आंब्याची जात.)
अंबा गळतीची आणखी काही कारणे आपण खालील प्रमाणे पाहूया
हवामानाचा परिणाम :
काही वेळा वातावरणामध्ये वारंवार बदल होत असल्यामुळे त्याचा आंबा गळती वरती देखील परिणाम होतो. वादळी वातावरण मोसमी पाऊस व दात धुके यामुळे देखील रोगराईचे प्रमाण वाढून फळगळतीचे प्रमाण वाढत जाते.
रोगराईचे प्रमाण : आंब्यामध्ये सर्वाधिक भुरी रोगासाठी ढगाळ वातावरण धुके आणि तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस यामध्ये भुरीचे प्रमाण वाढले जाते. भुरीचे प्रमाण वाढल्यानंतर पांढऱ्या रंगाचे आवरण तयार झाल्याने अविकसित मोहर आणि फळे गळून पडतात. याच कारणामुळे सर्वाधिक 30 ते 90% पर्यंत फळाचे नुकसान होते, व आंब्याला करपा रोगामुळे देखील फळांचा देठ आणि मोहर काळा पडून सुकतो या रोगामुळे लहान पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
आंबा फळगळतीसाठी करायच्या महत्त्वाच्या उपाययोजना
फळांची सेटिंग झाल्याबरोबर जेबरेलीक ऍसिड( 50 पीपीएम म्हणजेच एक ग्रॅम प्रति 20 लिटर पाणी याप्रमाणे) एक फवारणी घ्यावी लागते, यानंतर युरिया दोन टक्के म्हणजेच वीस ग्रॅम घालावा.
आंबा फळ हे बाजरी ते वाटाण्याच्या आकाराची झालेली असताना सामान्य वातावरणातील तापमान वाढण्यास सुरू होते अशावेळी फवारणी करणे खूप गरजेचे असते. mango crop management 2025
पाटाने पाणी देणे
फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये बागेतील तापमान हे सर्वाधिक म्हणजे 35° सेल्सिअस च्या पुढे गेलेले असते त्यामुळे तापमान कमी करण्यासाठी बागेमध्ये पाठाणे पाणी देणे गरजेचे असते. ठिबक जरी असले तरी मोकळे पाणी दिल्यास बागेतील आद्रता ओढून तापमान कमी होण्यास मदत होते, याच कारणामुळे गळणारी लहान फळे झाडावर टिकून राहतात.
अंबा बागेची आंतरमशागत
लहान फळे असलेल्या परिस्थितीमध्ये बागेत अंतर मशागत करणे प्रकर्षाने टाळावे अन्यथा फळांना इजा होऊन फळगळती मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. mango crop management 2025
सिंचन
फळबागेमध्ये विशेषता सिंचनावरती लक्ष देणे खूप गरजेचे असते, बागेमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार आत मध्ये वापसा स्थितीमध्ये राहील असे सिंचन व्यवस्थापन नेहमी करावे.
रोग नियंत्रण
भुरी व करपा या रोगाच्या किंवा तुडतुडे फुलकिडे या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी वेळापत्रकानुसार प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणीचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एकंदरीतच पाहायला गेले तर आंबा पिकासाठी शेतकऱ्याने विविध कृषी अधिकाऱ्यांचे सल्ले घेऊन बाग कशी व्यवस्थित आणता येईल यावर ती लक्ष देणे आवश्यक आहे.