
Bank Loan
Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात.? आपल्याकडे कोणते अधिकार आहेत..?
Bank Loan : अनेकदा आपल्या वैयक्तिक कामांसाठी Bank Loan कर्ज घेत असतो, गृह कर्ज असेल, कार घ्यायची असेल, टू व्हीलर घ्यायची असेल किंवा Education लोन असेल, मुलीचं लग्न असो किंवा इतर कोणताही पर्सन कारण असेल अशा सर्व महत्त्वाच्या कामांसाठी अनेकदा बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. परंतु बँक अपल्याला आपले एकंदरीत अकाउंट पाहून किंवा आपल्या ट्रांजेक्शन पाहून पर्सनल लोन देत असते, होम लोन देत असताना किंवा बिझनेस साठी लोन देत असताना बँका ह्या वेगवेगळे लोणचे वेगवेगळे व्याजदर सुद्धा बँक आकारत असतात.
अनेक वेळा प्रसंगी तारण काहीतरी ठेवून घेतलं जातं किंवा तुमचा सिबिल स्कोर पाहून तुम्हाला कर्ज दिलं जातं, मग होतं काय तर कर्जाची मुदत पूर्ण होईपर्यंत ईएमआय च्या रूपाने आपण कर्जाची परतफेड करत असतो, परंतु सगळं आपण ठरवलेलं आहे त्या प्लॅन नुसार होत नाही. काही ना काही अडचणी येतात मग होतं काय तर हप्ते थकतात किंवा कर्ज भरू शकणार नाही इथपर्यंत परिस्थिती डाऊन होत जाते, मग अशा परिस्थितीमध्ये त्या कर्जाचे काय होतं हा एक सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे, याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत.

आजचा आपला महत्वाचा चर्चेचा विषय आहे, जर का Bank loan घेतलं आणि ते लोन जर का वेळेवर फेडू शकलो नाही, आशा परिस्थितीत कर्जाचं काय होतं.? किंवा आपण बघणार अहित की, आपल्या वरती त्या कर्जाचा नक्की काय परिणाम होऊ शकतो.
कोणतीही बँक कर्ज माफ करत नाही. कर्जदाराचा मृत्यू झाला तरीसुद्धा बँक दिलेले पैसे आहेत ते पैसे वसूल करतेच, तुम्ही बँकांचे पेपर मध्ये आलेल्या नोटीस वाचत असालच तर त्यामध्ये एखाद्या प्रॉपर्टीचा लिलावा जाहीर केलेला असतो. तो अशाच परिस्थितीमध्ये बँकेने जाहीर केलेला असतो.
तसेच त्या मालमत्तेचा संपूर्ण ऍड्रेस देखील दिलेला असतो, किंवा कर्ज वसूल करण्यासाठी अनेकदा एजंट देखील घरी आलेले आपल्याला पाहायला मिळाले असतील. Bank Loan
कर्ज हा फार हार्ड विषय आहे, सर्वप्रथम आपण पर्सनल लोन किंवा ज्याला आपण अनसिक्युअर लोन म्हणतो त्याच्याविषयी बोलण्याचा विचार केला पर्सनल लोन फेडू शकले नाही, त्यावरती देखील बँक रिकव्हरी 100% करत असते. किंवा अनेकदा मोरगेज पद्धतीचे लोन असते त्यामुळे अनेकदा आपल्या मालकीच्या जमिनीवर बोजा देखील चढवला जातो. बँके जवळ रिकव्हरी करण्यासाठी अनेक एजंट देखील उपलब्ध असतात.
सेटलमेंट काय प्रकार.?
अनेक वेळा असं होतं की आपण गरजेचे वेळी क्रेडिट कार्ड वरून किंवा पर्सनल लोन Bank Loan म्हणून वेगवेगळ्या बँकेतून कर्ज घेत असतो परंतु अनेक अडचणीमुळे आपल्याला ते भरता येत नाही त्यावेळी बँकेतून भरपूर वेळा आपल्याला नोटीस बजावल्या जातात किंवा कॉल करून विचारणा केली जाते तरीदेखील आपण भरू शकलो नाही तर बँक बरेच वेळा वाट बघून सेटलमेंट करण्यासाठी विनंती करते म्हणजेच दिलेली रक्कम तेवढीच पूर्ण करा व्याज कोणत्याही प्रकारे आकारले जाणार नाही, अशी ग्वाही बँक देते त्याला आपण सेटलमेंट हा प्रकार म्हणतो. किंवा अनेक वेळा अशा केसेस कोर्टामध्ये देखील जातात. तेव्हा व्याजदर कमी केला जातो किंवा काही रक्कम ठराविक कमी केले जाते.
पण जर का खरंच तुमच्याकडून तुम्ही घेतलेल्या लोणचे हप्ते जर का थकले, व तुम्ही घेतलेल्या लोणचे हप्ते भरतच नसाल तर मात्र तुमच्या सीबील स्कोर वरती मोठा परिणाम होऊ शकतो. जो परत नॉर्मल होण्यासाठी कमीत कमी तीन ते चार वर्षाचा काळ जातो, त्याच्यामुळे आधीच सावध असलेला कधीही चांगलं सिबिल स्कोर बनवायला आपल्याला परत बँकेचे व्यवहार चांगल्या पद्धतीने करावे लागतात कोणतेही हप्ते वेळेतच भरावे लागतात त्यामुळे कर्ज घेतले असेल तर वेळेत हप्ते भरणे खूप महत्त्वाचे आहे.Bank Loan
सिबिल स्कोर खराब झाल्यावर काय होते.?
अलीकडच्या बँक ह्या कोणत्याही नागरिकाला त्याच्या सिबिल स्कोर वरती आकडे पाहूनच त्या नागरिकांना बँकेचे कर्ज दिले जाते आपला सिबिल स्कोर हा 700 पेक्षा जास्त असेल तर तो चांगला मानला जातो. त्यामुळे सिबिल स्कोर हा कर्ज घेण्यासाठी चांगला असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. Bank Loan
वसुली कशा पद्धतीने केली जाते.?
बँकेतून घेतलेल्या कर्जाचा हप्ता तुमच्याकडून जर का थकला किंवा डिफॉल्ट जर झाला तर रिकवरी एजंटचे तुम्हाला लगेच कॉल यायला सुरुवात होते. अनेकदा तुम्हाला वारंवार कॉल करून परेशान करत असतात, जेणेकरून तुम्ही कर्जाचे हप्ते भरावेत यासाठी. तुम्ही जर तरी देखील कर्जाचे हप्ते वेळेत भरत नसाल तर हे एजंट तुमच्या घरी देखील येतात. परंतु आरबीआयच्या काही गाईडलाच देखील आहेत तुम्ही जर कर्जाच्या हप्ते भरले नाही तर त्या एजंट ने आपल्या सोबत कसा व्यवहार केला पाहिजे याच्या नियम अटी देखील आहेत.
बँकांच्या माध्यमातून एजंट द्वारे जर कर्जदाराला व त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो तसेच कर्जदाराच्या नातेवाईकांना देखील विचारपूस केली जाते. एकंदरीत पाहिले तर कर्ज वसूल करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून किंवा एजंटच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जातात ज्यामध्ये अनेक वेळा अपमानास्पद वागणूक देखील दिली जाते.
आता जर का कर्जदाराचा मृत्यू झाला तर तर काय होऊ शकतो.?
एखाद्या व्यक्तीने गृह कर्ज Bank Loan घेतले आणि त्या व्यक्तीचा आकस्मितपणे मृत्यू झाला तर कर्ज हे संयुक्तपणे असेल तर तो व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर इतर व्यक्तीवर त्या कर्जाची जबाबदारी येऊन पडते त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडून ते कर्ज वसुली केले जाते. किंवा काही वेळेस त्या कर्जदाराने आपला इन्शुरन्स काढलेला असतो त्याच्या माध्यमातून ती कर्जाची वसुली केली जात असते परंतु कुठल्याही प्रकारे कोणतेही बँका कर्जबडीत जाऊ देत नाहीत.
सरकारी माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
सारांश :
अशाप्रकारे आपण जर एखाद्या बँकेचे लोन Bank Loan घेतले असेल किंवा आपल्याकडून ते हप्ते फेडले जात नसतील तर बँक कशा पद्धतीने कारवाई आपल्यावर करू शकते याची संपूर्ण माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न केला आहे माहिती आवडले असल्यास इतर नागरिकांना देखील शेअर करायला विसरू नका.